गुरुवार, १५ नोव्हेंबर, २०१२


तेव्हा एक कविता लिहिली ...............!!!!

तेव्हा एक कविता लिहिली .................
तू एक नाजूक काळी होती
तेव्हा एक कविता लिहिली .................

त्या कळीचे जेव्हा फुल झाले
तेव्हा एक कविता लिहिली .....................

श्रावणातल्या  सरींचे टपोरे थेंब
जेव्हा तुझ्या गालावरून ओघळत होते
तेव्हा एक कविता लिहिली .........................

चांदण्या रात्रीत जेव्हा तू
शीतल शांत चंद्रा कडे बघून हसायची
तेव्हा एक कविता लिहिली .................

तुझ्या सौंदर्याची स्तुती करायचो
तेव्हा एक कविता लिहिली ..........................

शीत प्रहरी जेव्हा स्वेटर घालून तू आली
तेव्हा एक कविता लिहिली .......................

अन ............................

जेव्हा तू मला दु:खाच्या सागरात
एकट्याला सोडून गेलीस
तेव्हा माझे शब्दही घेवून गेलीस
तेव्हा मात्र मला कविता आलीच नाही ...................

मोहन कु-हाडे....................
१२/१०/२०११

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा